बाल-गोपाळांसाठी आदर्शवत संकल्पना
शिर्डी: “शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी ” हा सुरेख अभंग आपण नेहमी ऐकतो आणि आपण ऐकून स्वताला धन्य धन्य मानतो. मात्र या विचाराशी एकरुप होण्याचा आपण विचार करत नाही. या अभंगाचा या प्रथम ओवीचा अर्थ शिर्डीतील एका 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने प्रत्यक्षात आणला आहे. त्याने गरजवंताची गरज ओळखून समाज्यातील उपेक्षीत आणि दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिवधनु्ष्य हाती घेतले आणि पुन्हा एक अभियंता, डॉक्टर, आणि एक सुशिक्षीत जबाबदार नागरीक घडवण्याची जबाबदारी घेवून पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरु केला.
शिर्डीत असे कितीतरी विद्यार्थी आहेत. जे आपल्या पालकांमुळे शिक्षणात पुढे आहेत. त्यांना त्यांचे पालक काहीही कमी पडू देत नाही. यंदा कोरोनाने अनेक विद्यार्थी घरुनच ऑनलाईन अभ्यास करतांना पाहीले. कधी नव्हे तर हा विद्यार्थी वर्ग मिडीयाशी एकरुप होवू लागला. त्यावेळी मीडिया मध्ये समाज्यातील गरीब झळकत होती. नेमकी याचा परीणाम, त्या विद्यार्थ्यावर होवू लागला. आज आपल्याला साई बाबांच्या कृपेने खुप काही मिळाले आहे. मात्र मी जिथे राहतो. त्या गावाच्या अवतीभोवती अशी कितीतरी खेडी आहेत. तिथे शिर्डीसारखी परीस्थिती मुळीच नाही. अशा विचाराने जेव्हा त्याच्या पालकांनी त्याला विचारले, आपण तुला कपडे घेवून येवू. आता तुझ्या अंगातील कपडे तुला छोटे होवू लागले आहेत. तेव्हा तो म्हणाला, बाबा, मला कपडे छोटे झाले , म्हणून कपडे आणणार आहात. पण आज या कोरोनामध्ये काहींना कपडे तर सोडा, पण ऑनलाईन अभ्यास सुध्दा होत नाही. आणि हे कपडे चांगले आहेत. फक्त छोटे कपडे आहेत म्हणून फेकून देण्यापेक्षा आपण एखाद्या गरजूवंताला देवूयात. आणि माझी जी गेल्या वर्षीची पुस्तक व वह्या आहेत त्या रद्दीत न देता. गरजुवंत मुलांना देवू या. आणि याच प्रकारे ज्यांच्याकडे अशी जुनी कपडे, पुस्तक असतील ती गोळा करू त्याचे वाटप करू. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी स्वताच्या आजारासाठी गोळ्या औषध घेतात. त्यातली निम्मी औषध आपण घेऊन व उरलेली कच-यात टाकून देतात. त्यापेक्षा त्या लोकांकडून ती औषधे जमा करून ग्रामिण रुग्णालयात देवू, जेणेकरून गरीबांना जी औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतील. ती त्यांना विकत घ्यावी लागणार नाही. म्हणजे गरजवंताला गरज देण्याच काम पूर्ण होऊ शकतो. म्हणून ही व्यापक चळवळ सुरु झाली.
आपण हे गाण ऐकलच असेल ना, “ मधुबन खुशबू देता है, सागर पाणी देता है, जीना उसका जीना है, जो औरो के जीवन देता है” असच काहीसे कार्य साई बाबांच्या या पुण्यभूमित साईश विनोद गोंदकर हा करीत आहे. त्याने हे काम करतांना आपल्या शर्टावर "निड फॉर निडी" असे घोष वाक्य लिहून कार्य सुरू केले. कोरोनाच्या काळात त्याने हे कार्य करतांना कोरोनाच्या बचावासाठी जनजागृतीही करत होता. त्याच्या या कार्यासाठी शिर्डीकर त्याला भरभरून प्रतिसाद देत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे कमलाकर कोते, शंकर ऊर्फ सुनील गोंदकर, ए.एस. गंगवाल, विक्रम (वेद) भाटीया, सुदर्शन दुरचित्रवाहिणीचे संपादक सुरेश चव्हाणके, संजय कोतकर, प्रमोद गायके, रेखा रनमाळे, डॉ.आकाश बाफना, सूनिल रमेश कोते, आदींनी आपल्या घरातील औषधे, मुलांची जुनी पुस्तके, पेन्सिल, रबर, कंम्पास पेटी, जुने आणि नवे कपडे गरीबांच्या मुलांसाठी दिलेली आहेत. असे हे अभियान दर रविवारी साईश हा राबवत असतो. आणि परीसरातील सावळी विहीर, रुई, पिंपळवाडी, अस्तगांव अशा गांवातील विटभट्टी, उसतोडीवाले व इतर गरीबांना वाटप केले जातात. त्याचे हे कार्य तो शिकत असलेल्या रेन्बो इंटरनॅशनल स्कूलचे संचालक आकाश नागरे व प्राचार्या शैला झुंजारराव यांना कळाल्यावर त्यांनी सुद्धा त्याचे कौतुक करून त्यास शालेय वस्तू, कपडे व औषधे देऊ केले. त्याचे हे कार्य शिर्डीपर्यंत न रहता. शिर्डी बाहेरही गेले आहे. साईश मध्यतंरी मुंबईतील सफाळातील केळवा बीच या ठिकाणी पर्यटनासाठी गेला होता. तिथे जयेश राऊत यांच्या घरी जावून त्याचे मुले साईश व विदीश यांना सांगून हे अभियान सुरु ठेवण्यास मार्गदर्शन केले. तसेच असेही म्हणणे आहे की, जगातील प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातील दोन तास कुठल्याही समाज कार्यास समर्पित करावे.
तो सध्या नववीत शिकत असून त्यांने खेळ, विविध स्पर्धा परीक्षा देत आजपर्यंत जवळपास 120 च्या आसपास प्रमाणपत्र मिळवलेली आहे. त्याची इच्छा शास्त्रज्ञ होण्याची आहे. त्याला वाटते त्याच्याबरोबर भरपूर शास्त्रज्ञ आणि उच्च पदस्थ अधिकारी व्हावेत, त्याच्या या अभियानास शिर्डीकर साथ देत आहेतच. आपणही साथ द्यावी अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
https://www.thekhabarbharat.com/2021/03/blog-post_563.html
0 Comments